क्षमा

Pages

  • My Thoughts
  • My Favorite Videos
  • My Recipes

Friday, March 21, 2014

लग्न म्हणजे?


लग्न म्हणजे रेशीम गाठी ,
लग्न म्हणजे जुळती नाती ,
लग्न म्हणजे साता जन्मांची तपस्या
लग्न म्हणजे साथीने सोडवाव्या समस्या

लग्न म्हणजे तन मनाचे मिलन
लग्न म्हणजे नात्यांची गुंफण
लग्न म्हणजे धर्म-अर्थ-काम- मोक्षाप्रद नेणारा मार्ग
लग्न म्हणजे दोन घराण्यांच्या साथीने आपले जीवन करावे कृतार्थ

लग्न नाही खेळ , जुळवावा लागतो सुख दुःखाचा मेळ
खर सांगायचं तर लग्न म्हणजे
कुटुंब , समाज, जबाबदारी , बांधिलकी यांची रुचकर भेळ !!!!!
Posted by Kshama at 10:07 AM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: नाती, रेशीम गाठी, लग्न, समाज

Friday, March 14, 2014

चरबी किंवा मेद (स्वरूप व उपाय )

पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया.
वजन कमी करण्यासाठी दोन महत्वाच्या क्रिया होणे आवश्यक आहे. प्रथम आहारावर नियंत्रण व दुसरे मेद विलयन करून तो शरीरा बाहेर काढणे. ह्याला मेदनाशक औषधांचा (थर्मोजेनिक म्हणजे ऊष्मा वाढविणारी औषधे) उपयोग करावा लागतो. चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. म्हणून मेद नाशक औषधे स्वाभाविकपणे पित्ताची वाढ करतात. त्यामुळे आपोआप भूकही वाढते. म्हणून अशा औषधांमुळे घशाशी आंबट/कडू येणे, छातीत जळजळ होणे अशी लक्षणे होऊ लागतात. शिवाय औषध घेणे बंद केल्यानंतर भूक वाढते व अन्न जास्त प्रमाणात खाल्ले जाते. पित्तशमन औषध जेवणाच्या आधी घेण्यामुळे पित्त स्राव कमी होतो, भूक सौम्य होते शिवाय ऊष्मा वाढविणारी म्हणजेच मेदनाशक औषधांच्या ऊष्ण गुणांपासून आतड्यांच्य नाजुक आवरणाचे संरक्षण होते. ही प्रक्रिया योग्य रीतीने होण्यासाठी पित्तशमन २ गोळ्या जेवणाच्या दोन ते तीन तास आधी घ्याव्यात व मेदनाशक च्या २ गोळ्या जेवणानंतर लगेच घ्याव्यात.
आपला आहार-विहार हा शरीरातील सर्व घडामोडींसाठी कारणीभूत असतो. त्यामुळे आहार-विहार आहे तसाच चालू ठेवून वजन कमी करण्याचा प्रयत्न करणे चुकीचे ठरेल. गोड पदार्थ किंवा तळलेले/तुपकट पदार्थ टाळले पाहिजेत ही बाब अगदी लहान मुलांना पण माहिती असते. आयुर्वेदानुसार आरोग्य विषयक मूलभूत सिध्दांतांच्या आधारे काही लहान-सहान गोष्टी अमलात आणल्या तर परिणाम लवकर होतो व प्रकृती उत्तम राहते. ही माहिती वाचतांना आपल्याला काही गोष्टी कदाचित चुकीच्या किंवा प्रवाहाच्या विरुध्द वाटतील, पण ह्या गोष्टी अनेक पिढ्यांच्या अनुभवातून सिध्द झालेल्या आहेत.
१) गोड पदार्थ जेवणाच्या शेवटी खाण्याची एक प्रथा आहे. आयुर्वेदानुसार गोड पदार्थ जेवणाच्या सुरुवातीला खावेत, शेवटी खाणे योग्य नाही. अतिरिक्त चरबी वाढण्याचे हे एक महत्त्वाचे कारण आहे. हा मुद्दा नीट समजण्यासाठी एक प्रयोग स्वतः करून पहा. एक दिवस नेहमीचे जेवण झाल्यानंतर ठराविक प्रमाणात काही गोड पदार्थ खा. १-२ दिवसांनी तोच गोड पदार्थ तेवढ्याच प्रमाणात जेवणाच्या सुरुवातीला खा. आपल्याला नहमीपेक्षा निम्मे जेवण जाईल. म्हणजेच आपल्याला जेवढी खरी भूक आहे तेवढेच अन्न घेतले जाते, अनावश्यक किंवा अवाजवी अन्न घेणे अशा प्रकारे सहज टाळता येऊ शकते. जेवणानंतर पान खाण्याची पध्दत योग्यच नव्हे तर शास्त्रीय आहे. ह्याचा अर्थ प्रत्येकाने पान खावे असा न घेता, जेवणाचा शेवट गोड पदार्थाने करू नये, एवढा अर्थ नक्कीच घेतला पाहिजे. शरीराला हलकेपणा आणण्याचा हा अगदी सहज सोपा उपाय आहे.
२) सर्व फळांमधे कमी-जास्त प्रमाणात साखर असते. त्या साखरेला उतारा म्हणून निसर्गाने सोबत कडू-तुरट चवीच्या बिया व साली दिल्या आहेत. बिया व सालींमधे अधिक प्रमाणात जीवनसत्व असतात. आपण फक्त चवीच्या सुखानुभवा पायी ही जीवनसत्व वाया घालवतो. वजन कमी करण्याचा निश्चय केलेल्यांनी सहज शक्य होतील तेवढ्या बिया व साली फेकून देऊ नयेत.
३) चरबी किंवा मेद हा मेणासारखा असतो. ऊष्णतेमुळे सहज वितळतो अर्थातच थंडपणामुळे गोठून एका ठिकाणी पक्का बसतो. आपल्याला वजन कमी करण्याची खरी इच्छा असेल तर थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स किंवा इतर थंड पदार्थ घेणे वर्ज्य करा. चरबीच्या नियंत्रणासाठी शरीर आपणहून ऊष्ण स्वभावी पाचक-स्राव तयार करीत असते. मेदाच्या नियंत्रणासाठी वर्णन केलेली बहुतेक सर्व औषधे पाचक-स्राव वाढवूनच चरबी कमी करतात. अन्न घेतल्यानंतर लगेच थंड पाणी, कोल्ड ड्रिंक्स, लस्सी, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ घेण्यामुळे त्या पाचक-स्रावांचा परिणाम एकदम सौम्य होतो आणि चरबी साठून राहण्यासाठी कारण होते. अन्न पचवणारे पाचक-स्राव विस्तवासारखे ऊष्ण असतात. त्यावर थंड पदार्थ किंवा थंड पाणी ओतल्यावर काय होईल ह्याचा आपणच विचार करा.
४) चहा-कॉफी सारखी साखरयुक्त पेय दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा घेऊ नयेत. त्याच्या घोटा घोटा बरोबर पोटात जाणारी साखर नकळतपणे चरबी वाढविण्यास कारण होते.
५) जेवणानंतर कधीही लगेच झोपू नये. शतपावली करणे चांगले. जेवणानंतर येणारी झोप ही खरी झोप नसून ती केवळ सुस्ती असते ज्याने शरीराचा बोजडपणा वाढीस लागतो. वामकुक्षीच्या नावाखाली डाराडूर झोप काढणे म्हणजे वजन वाढीला व एकंदरित रोगराईला आग्रहाचे आमंत्रण देण्यासारखेच आहे.
६) लवकर झोपून लवकर उठावे, हा नियम आरोग्यासाठी खरोखर लाख मोलाचा आहे. उशीरा झोपून उशीरा उठणारे शेकडा नव्वद टक्के लोक तब्बेतीने जाडजूड असतात असे आढळून येते.
७) दूध व दुधाचे पदार्थ नियमितपणे घेऊ नयेत. दुधातील पौष्टिक प्रथिनांची किंवा पिष्टमय पदार्थांची गरज भागल्यानंतर हे पदार्थ घेणे चालूच ठेवले तर त्यांचे रूपांतर चरबीत होते. दुधाचे दात पडले की नियमितपणे दूध पिणे आवश्यक नसते हे लक्षात ठेवावे.
८) निसर्गाच्या निर्मात्याने मनुष्य शरीराची रचना ही मांसाहार पचनासाठी केलेलीच नाही . ज्यांना मांसाहार केल्याशिवाय चैन पडत नाही त्यांनी आठवड्यातून एक किंवा जस्तीत जास्त दोन जेवणातच मर्यादित प्रमाणात मांसाहार घ्यावा.
९) बैठ्या कामामुळे मेद वाढतो. सतत कार्यक्षम राहा, सुस्ती आणि आळशीपणा टाळा. दारावरची बेल वाजली की ‘दुसरा कोणी उठण्याआधी आपण दार उघडण्यासाठी उठा’. अशा साध्या-सोप्या सवयी अंगी बाळगण्यामुळे शारीरिक हालचाली वाढून वजन वाढण्याची सवय कमी होते.
१०) दुपारी झोपण्याची सवय केवळ वजन वाढण्याच्या दृष्टिकोनातूनच नव्हे तर एकूण आरोग्या साठी पण अत्यंत हानिकारक आहे. अशी सवय लागली असेल तर ती ताबडतोब सोडावी, चांगल्या मुहूर्ताची वाट बघू नये. सवय मोडतांना काही दिवस त्रास वाटेल पण कालांतराने होणारे चांगले परिणाम अतिशय महत्वाचे आहेत हे विसरून चालणार नाही.
११) जेवण झाल्यानंतर “आता पोट भरले, आता आणखीन अन्न नको” हा संदेश मेंदूतून निर्माण होतो. पोट भरल्या नंतर १० ते १५ मिनिटां नंतर हा संदेश निर्माण करण्याची यंत्रणा मेंदूतून कार्यरत होते. म्हणून साधारण प्रमाणात अन्न घेऊन झाल्यावर १० ते १५ मिनिटे थांबून मग स्वतःलाच प्रश्न विचारावा, “अजून खरोखर भूक आहे का?” जर उत्तर “नाही” मिळाले तर लगेच पडत्या फळाची आज्ञा समजून ‘बस्स’ करा.
१२) जास्त जेवण घेण्याची सवय चरबी वाढण्याचे कारण आहे. क्रमाक्रमाने आहार चार घास कमी घेण्याची सवय केली तर थकवा न जाणवता वजन कमी राहून स्वास्थ्य उत्तम राहते.
१३) ‘भात खाण्यामुळे वजन वाढते’ असा एक गैरसमज सर्वत्र आढळतो. भात हे दक्षिण भारतीयांचे मुख्य अन्न आहे व गव्हाचे पदार्थ पंजाब किंवा उत्तर भारतीयांचे. अंगकाठीचा विचार केल्यास दक्षिण भारतीयांची एकूण प्रकृती बारीक असते तर उत्तर भारतीयांचे वजन काय किंवा एकंदर शरीर जास्त धडधाकट दिसते. तांदळाच्या शेतीसाठी आणि प्रत्यक्ष भात शिजवण्यासाठी भरपूर पाणी लागते. त्यामुळे भात पोटात गेल्यावर पोट लवकर भरल्यासारखे वाटते खरे पण त्यामधून पोषक अंश फार कमी प्रमाणात घेतले जातात. तांदूळ कोरडे भाजून थोडे तांबुस झाल्यावर त्याचा भात करावा. वजन कमी करण्यासाठी हा पचायला हलका भात म्हणून फार उपयोगी होतो. व्यवस्थित जेवण झाल्यानंतर भात खाण्यामुळे मात्र मेद वाढतो कारण पाचक स्त्रावांना थंड करण्याची किमया ह्या ‘शेवटच्या भातामुळे’ होते. केवळ भात खाऊन वजन वाढत नाही हे लक्षात ठेवावे.
१४) दिवसातून किती वेळा आहार घ्यावा ह्या विषयी अनेक मतभेद आढळतात. कोणी सांगतात “थोड्या-थोड्या वेळाने थोडाथोडा आहार घ्यावा” तर कोणाच्या मते “ठराविक वेळी पोटभर जेवावे”. अशा वेळी काय बरोबर व काय नाही अशी शंका आपल्या मनात नक्कीच घर करून राहात असेल. अशा संभ्रमाच्या वेळी ‘आयुर्वेदाची शिकवण योग्य’ असेच मानावे. आयुर्वेदात “याम मध्ये न भोक्तव्यं, याम युग्मं न लंघयेत्” असा श्लोक आहे. ह्याचा अर्थः “चार तासांच्या आधी काही खाऊ नये व आठ तासांपेक्षा जास्त वेळ उपाशी राहू नये.
१५) मद्यपान करण्याची आवड असेल तर त्याविषयी थोडी शास्त्रीय माहीती: मद्यपान करण्याची भारतात पध्दत म्हणजे जेवणाच्या आधी घेऊन नंतरच जेवणाचा कार्यक्रम असतो. मद्यपानामुळे पाचक-स्राव वाढतात व परिणामी भूक वाढते म्हणून जरुरी पेक्षा जास्त आहार घेतला जातो. जेवणाच्या नंतर मद्यपान करण्यामुळे वाढलेले पाचक-स्राव हे अन्न लवकरात लवकर पचवण्यासाठी उपयोगी पडतात. शिवाय जेवणाच्या आधी केलेल्या मद्यपाना मुळे सर्व अन्नघटक मेदात रूपांतरित होतात असे शास्त्रीय प्रयोगांच्या आधारे सिध्द झाले आहे. म्हणून मद्यपान करण्याची आवड असेलेल्यांनी जेवणानंतरच मद्यपान करावे. ज्यांना चरबी वाढवण्याची इच्छा असेल त्यांनी जेवणाच्या आधी घेऊन चालेल.
१६) कडधान्यांबद्दल थोडक्यात: मोड आलेली कडधान्य स्वास्थ्यासाठी उत्तम असे आपण अनेक ठिकाणी वाचले असेल. काही अंशी हे खरे आहे. त्यातील महत्वाचा मुद्दा असा की ज्या वयात पचन शक्ती उत्तम असेल किंवा नियमित व्यायाम करण्याची सवय असेल तरच मोड आलेली कडधान्य खावीत. वयाच्या ४५-५० नंतर ही कडधान्य त्रासदायक ठरतात. ह्या वया नंतर ‘भर्जित’ म्हणजे भाजलेले धान्यच आहारात वापरावे. भाजलेल्या धान्याला कितीही भिजवले तरी मोड येत नाहीत. मेद किंवा चरबी विषयी जागरूक असलेल्यांनी कडधान्य टाळणे महत्वाचे आहे. ह्या उलट वजन वाढवण्यासाठी कडधान्यांचा वापर आहारात नियमितपणे करावा.
१७) व्यायाम कसा, कोणता व किती करावा: व्यायामाचे फायदे सांगण्याची गरजच नाही. ह्या विषया बद्दल काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे, कोण किती व्यायाम करतो ह्या पेक्षा त्यात किती नियमितपणा आहे हे सर्वात महत्वाचे. वजन कमी करण्यासाठी कशाप्रकारचे व्यायाम करावेत? शरीरात मेद कुठे साठतो? चरबीच्या पेशी कुठे जमा होतात? काही प्रकारचे व्यायाम मस्तपैकी भूक वाढवतात तर काही व्यायाम चरबी हटवतात. त्वचा आणि मांसधातूच्या मधे ह्या चरबीच्या पेशी दबा धरून असतात. त्यामुळे मांसपेशींना पीळ पडेल असे व्यायाम चरबी हटवण्यासाठी उत्तम. ओला कपडा लवकर सुकण्यासाठी जी पिळण्याची पध्दत आहे तशी ही व्यायामाची क्रिया करावी.
निबंधा देशमुख यांनी शेयर केलेल्या माहिती वरून 


  • Kshama Bade
Posted by Kshama at 7:03 PM 1 comment:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: आयुर्वेद, आहार, चरबी, मेद, वजन, व्यायाम

Saturday, March 8, 2014

हरिहर किल्ला


फोटो आणि माहिती सौजन्य : टी राजू लक्ष्मण 
हरिहर किल्ला


पाय-या नष्ट करण्याच्या कुत्सित हेतूने आलेला इंग्रज अधिकारिही या पाय-यांच्या प्रेमात पडला....म्हणून या आज आपणास दिसत आहेत. 
पहिला दरवाजा दिसतोय त्याच्यापलिकडेही डोळ्याचे पारणे फेडणा-या पाय-या आहेत. जीवनात हां थरार आपण एकदा तरी अनुभवाच.....!!!
इगतपुरी -घोटीपासून जवळच आहे हां किल्ला...!!

पोहोचण्याच्या वाटा :
किल्ल्यावर जाण्यासाठी प्रामुख्याने दोन मार्ग आहेत, पुढे दोन्ही मार्ग एकाच ठिकाणी येऊन मिळतात.
"निरगुडपाडा" हे गाव खोडाळा - त्र्यंबकेश्वर मार्गावर आहे. त्र्यंबकेश्वर पासून २० किमी वर निरगुडपाडा गाव आहे. येथे जाण्यासाठी मुंबईहून २ मार्ग आहेत.

१)मुंबई - कल्याण - कसारा - खोडाळा - निरगुडपाडा ( १९४ किमी),

२) मुंबई - कल्याण - भिवंडी - वाडा - खोडाळा - निरगुडपाडा (१९० किमी)

तसेच इगतपूरी व नाशिकहून त्र्यंबकेश्वरमार्गे निरगुडपाड्याला जाता येते. हरीहरकिल्ला व भास्करगड या दोनही गडांच्या पायथ्याचे गाव निरगुडपाडा आहे.



३) कसारा किंवा नाशिक मार्गे :-
कसारा किंवा नाशिक मार्गे इगतपूरी गाठावे. इगतपूरीहून त्र्यंबकेश्वरकडे जाणारी बस पकडावी. वाटेत असणारे निरगुडपाडा हे हरिहरच्या पायथ्याचे गाव आहे. गावातून किल्ल्यावर जाण्यास दोन तास पुरतात. हरिहरच्या कातळभिंती जवळ पोहोचल्यावर पुढे किल्ल्यावर जाण्यासाठी कातळात खोदलेल्या पायर्‍या आहेत.

४) इगतपूरी - त्र्यंबकेश्वर - खोडाळा मार्गे :-
निरगुडपाडा गावाच्याच पुढे कासुर्ली नावाचे गाव आहे. इगतपूरी-त्र्यंबकेश्वर-खोडाळा या बसने या गावात उतरता येते. या गावातून समोरच्या डोंगरावर चढून गेल्यावर हर्षेवाडी नावाची वाडी लागते. या वाडीतून या किल्ल्यावर पोहोचण्यास १ तास लागतो. ही वाट सोपी आणि कमी दमछाक करणारी आहे.

फोटो आणि माहिती सौजन्य : टी राजू लक्ष्मण 
Posted by Kshama at 8:11 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: इगतपूरी, त्र्यंबकेश्वर, हरिहर किल्ला

Friday, March 7, 2014

संस्कार भारती रांगोळी

Sanskar Bharati Rangoli 

Posted by Kshama at 10:48 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest

Thursday, March 6, 2014

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Happy International Women's Day
कार्येषु दासी , कारणेषु  मंत्री ,भोजेषु माता , शयनेषु रंभा
रूपेषु लक्ष्मी , क्षमायेषु धरित्री ,शत धर्म युक्ता ,कुल धर्म पत्नी

अशा प्रकारे तन , वाणी आणि मनाने जी पूर्ण पणे समर्पित आयुष्य जगते अश्या त्या स्त्रीच्या गौरवाचा आजचा दिवस .

जागतिक महिला दिन !!!!!!!

दासी सारखे काम करणारी , मंत्री किंवा  प्रसंगी योग्य सल्ला देणारी सल्लागार , आई च्या प्रेमाने
जेवू घालणारी , अप्सरे प्रमाणे सुख देणारी , लक्ष्मि सारखी सुंदर , पृथ्वी इतका संयम बाळगणारी आणि क्षमाशील अशा
सहा भूमिका प्रत्येक स्त्री आपल्या कुवती प्रमाणे निभावण्याचा सतत प्रयत्न करत असते .  आणि यामुळेच स्त्रीशक्तीच
महत्व टिकून आहे . बदलत्या काळा प्रमाणे आज तिला तिची जीवन शैली जरी बदलावी लागत असली ,तरी तिच्यातील
स्त्रीत्वाचे गुण परोपरीने जपण्याचा तिचा प्रयत्न किंवा लढा  हा सतत सुरु असतो .  नवीन युगात योग्य अयोग्याचे भान ठेवण्याचा तिचा सतत प्रयत्न असतो आणि यात तिची तारेवरची कसरत सुरु असते .

आपण सहजच विचार केला तर आपल्या अस लक्षात येईल कि  शंभर वर्षांपूर्वी भारतीय स्त्री ची दिनचर्या व आजच्या भारतीय स्त्री ची दिनचर्या आणि तिच्या जबाबदार्या ह्यात विलक्षण अंतर आहे .  विश्लेषणच करायचं झालं तर

शंभर वर्षांपूर्वी स्त्रीची दिनचर्या

पहाटे उठणे ,आन्हिक आवरणे  ,देवघरात दिवा लावणे ,सडा रांगोळी , देवपूजेची तयारी ,दळण , कांडण , पाणी भरणे ,जमीन , चूल सारवणे ,सोवळ्यातील स्वयंपाक (चुलीवर )(काहींना गाय गुरांसाठी चारा आणि गोठ्याची कामे करावी लागत असत तर काही ठिकाणी शेतीची कामेही केली जात ),घरातील लहान मुले ,वृद्ध यांची काळजी घेणे योग्य वेळी घरातील जेवणखाण उरकणे ,(प्रसंगी घरातील कुलधर्म कुलाचार योग्य रीतीने पार पाडणे ) इत्यादी , सायंकाळी त्या स्त्रीचा दिवस संपत असे.


आजच्या स्त्रीची दिनचर्या (सर्वसाधारण ८०% स्त्रिया आज नोकरी व्यावासायाकरता बाहेर पडत असतात हे गृहीत धरून लिहित आहे )

पहाटे उठणे , आन्हिक आवरणे , आपल्या कुटुंबाच्या डब्यांसाठी जेवण तयार करणे , मुल लहान असेल तर त्याच्याबरोबर  पाळणाघरात द्यायच्या
वस्तूंची तयारी करणे किंवा मुलाला शाळेत जायला तयार करणे , स्वताची तयारी करणे  आणि वेळेवर कार्यालयात हजर होण्यासाठी बाहेर पडणे . संध्याकाळी थकून घरी आल्यावर पुन्हा रात्रीच्या जेवणाची तयारी करणे , टिव्ही  वर आवडीच्या मालिका पाहणे , मुलांचा अभ्यास घेणे .
या सर्वात जमेल तसे स्त्री वेळो वेळी येणारे सण , समारंभ योग्य रीतीने साजरे करण्याचा आणि नातेवाईकांप्रती आपली कर्तव्ये पार पडण्याचा शिकस्तीचा प्रयत्न करते . काही वेळा संयुक्त कुटुंब असेल तर घरात मोठी माणसे असतात पण पुष्कळ विभक्त कुटुंबात हीच दिनचर्या पहावयास मिळते .

आता या दोन्हीची तुलना केली तर तुम्हाला काय वाटत, खर्या अर्थाने उत्तम आयुष्य कोणती स्त्री जगली?

खरतर याच उत्तर फार अवघड आहे पण त्याही पेक्षा अवघड आहेत ते प्रश्न जे बदललेल्या जीवनशैली मुळे या ८० टक्के स्त्रियांना सामोरे जावे लागत आहेत . मग ते त्यांच्या स्वास्थ्या संबंधी असतील , नात्यांसंबंधी असतील , त्यांच्या मातृत्वासंबंधी असतील किंवा अन्य .

आज जागतिक महिला दिन साजरा करताना एकाच गोष्टीची  खंत वाटते कि स्त्री संबंधी असणाऱ्या समस्यांचं स्वरूप बदलत आहे , तीची आर्थिक बाजू जरी बळकट होत असली तरी मानसिक आणि शारीरिक समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत . अशा समस्यांवर मात  करण्यासाठी तिला कुटुंबाच्या खंबीर पाठिंब्याची आवश्यकता आहे .  फार कमी स्त्रियांना असा आधार मिळतो परंतु बर्याच अंशी स्त्रिया त्यापासून वंचित राहतात .  खर्या अर्थाने तुमच्या घरातील स्त्री चा आदर वाटत असेल तर आज पासून तिच्या मागे खंबीर पणे उभे राहा ! तुमच्या सहकार्याने तुम्ही तिचे आयुष्य व आपले आयुष्य आनंदी ठेवू शकता .

Posted by Kshama at 9:24 PM No comments:
Email ThisBlogThis!Share to XShare to FacebookShare to Pinterest
Labels: आनंद, जागतिक महिला दिन, महिला, स्त्री, स्त्रीशक्ती, स्वातंत्र्य
Newer Posts Older Posts Home
Subscribe to: Posts (Atom)

Visit Again

Check Offers

Blog Archive

  • ►  2024 (1)
    • ►  November (1)
  • ►  2023 (5)
    • ►  February (4)
    • ►  January (1)
  • ►  2022 (9)
    • ►  December (2)
    • ►  October (1)
    • ►  August (1)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ►  May (2)
    • ►  April (1)
  • ►  2021 (7)
    • ►  December (2)
    • ►  July (2)
    • ►  June (2)
    • ►  May (1)
  • ►  2020 (2)
    • ►  May (2)
  • ►  2019 (18)
    • ►  November (2)
    • ►  August (1)
    • ►  June (2)
    • ►  April (2)
    • ►  March (2)
    • ►  February (7)
    • ►  January (2)
  • ►  2018 (126)
    • ►  December (3)
    • ►  November (32)
    • ►  October (26)
    • ►  September (11)
    • ►  August (1)
    • ►  July (17)
    • ►  June (7)
    • ►  May (17)
    • ►  April (6)
    • ►  March (1)
    • ►  February (3)
    • ►  January (2)
  • ►  2017 (15)
    • ►  November (2)
    • ►  October (4)
    • ►  May (1)
    • ►  March (6)
    • ►  February (2)
  • ►  2016 (9)
    • ►  May (2)
    • ►  April (1)
    • ►  March (5)
    • ►  January (1)
  • ►  2015 (16)
    • ►  October (2)
    • ►  September (1)
    • ►  August (1)
    • ►  July (3)
    • ►  May (4)
    • ►  April (1)
    • ►  March (4)
  • ▼  2014 (14)
    • ►  December (2)
    • ►  November (1)
    • ►  October (1)
    • ►  September (1)
    • ►  July (1)
    • ►  June (1)
    • ▼  March (5)
      • लग्न म्हणजे?
      • चरबी किंवा मेद (स्वरूप व उपाय )
      • हरिहर किल्ला
      • संस्कार भारती रांगोळी
      • जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
    • ►  February (1)
    • ►  January (1)
  • ►  2013 (115)
    • ►  December (1)
    • ►  November (1)
    • ►  October (3)
    • ►  September (5)
    • ►  August (2)
    • ►  July (3)
    • ►  June (5)
    • ►  May (20)
    • ►  March (21)
    • ►  February (54)

विचार गंगा .. माझा विचार प्रवाह

My photo
Kshama
गेले काही दिवस रोज मनात येणाऱ्या विचारांना शब्दात उतरवायचा एक छोटा प्रयत्न करत होते आणि अस लक्षात आल कि आपण आपले विचार सहज सोप्या शब्दात मांडू शकतो आणि त्यातून बरच काही शिकू शकतो. माझे विचार हे माझ्या आयुष्यातील चांगल्या / वाईट अनुभवातून उमटलेल्या भावना आहेत. वाचक त्यांच्याशी सहमत असतील किंवा नसतीलही परंतु वाचकांच्या प्रतिक्रिया फार मौल्यवान आहेत. माझ्या या छोट्या भावविश्वात आपले स्वागत आहे.
View my complete profile

Rangoli

Rangoli

Contact Form

Name

Email *

Message *


Popular Posts

  • शनि महात्म्य
    मला आवडलेले मराठीतील 80 ओव्यांचे शनि महात्म्य इथे देत आहे.  वाचायला सोपे आणि लवकर पाठ होईल असे स्तोस्त्र आहे. ज्यांना मोठे शनि महात्म्...
  • चरबी किंवा मेद (स्वरूप व उपाय )
    पित्तशमन औषधे व मेदनाशक औषधांची जोडी मेद कमी करण्यासाठी कशी कार्य करते ह्या विषयी थोडक्यात माहीती बघूया. वजन कमी करण्यासाठी दोन...
  • प्रवास : एक सुखद अनुभव
    प्रवास हि एक आनंद देणारी गोष्ट आहे. मग तो प्रवास  मामाच्या गावाला जायचा असुदे किंवा पर्यटन स्थळी , देव दर्शनासाठी किंवा अन्य कोणत्याही चा...
  • दुष्काळ : जबाबदार कोण?
    Drought सकाळी उठल्यावर डोळे उघडल्या उघडल्या आपण   कराग्रे वसते लक्ष्मि , कर मध्ये   सरस्वती , करमुले     तू गोविन्दम , प्रभात...
  • मोराची चिंचोली : दुसरा भाग
    मोराची चिंचोली : पहिला भाग  मोराच्या चिंचोलीला कस पोचाल  ?                                                                 पुणे ते चिंचो...
  • Chaturmas Rangoli Stencils चातुर्मास रांगोळी सेट चातुर्मास शुभ चिन्हे
  • माझिया मना .. माझा विचार प्रवाह
    गेले काही दिवस रोज मनात येणाऱ्या विचारांना शब्दात  उतरवायचा एक छोटा प्रयत्न करत होते आणि अस लक्षात  आल कि आपण आपले विचार सहज सोप्या शब्...
  • वंदे भारत आतून नक्की कशी आहे? How is Vande Bharat from inside #Mumbai ...
  • मोराची चिंचोली : भाग पहिला
    नाचरे मोरा   आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर कि...
  • लाकडी रांगोळी बॉर्डर साचे प्लास्टिक रांगोळी बॉर्डर साचे योग्य दारात घरप...
Kshama. Picture Window theme. Powered by Blogger.