Saturday, August 1, 2015

मोराची चिंचोली : दुसरा भाग

मोराची चिंचोली : पहिला भाग 
मोराच्या चिंचोलीला कस पोचाल  ?

                                                                पुणे ते चिंचोली मोराची


मुंबई ते मोराची चिंचोली 
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रात राहण्याची उत्तम व्यवस्था होते . रुपये १५०० ( एका व्यक्ती करिता ) आकारले जातात . त्यात रहायची सोय तसेच आपण पोहचू  त्यादिवशीचा नाश्ता , जेवण आणि संध्याकाळी उपहार  तसेच दुसऱ्या दिवशी सकाळी नाष्ट्या पर्यंतची सोय होते . दुसऱ्या  दिवशी जेवण व्यवस्था हवी असेल तर अतिरिक्त पैसे आकारले जातात .


आगावू बुकिंग करण्या करिता तुम्ही ९८२३३४७२३३ / ९६२३२५२४४४ /९६६५८३७७७७ वर संपर्क करू शकता . पर्यटन केंद्रात मोर पाहण्यासाठी मयुर कट्टा बांधलेला आहे . सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी इथे मोर सहज पाहायला मिळतात . बैलगाडी आणि ट्रक्टर सफारीचा आनंदही घेत येतो . पर्यटन केंद्रात
किल्ल्यांची आणि अंतराळाविषयी महिती देणारा एक छोटे खानी विभाग पाहायला मिळतो . ग्रामीण जन जीवन दर्शवणारे देखावे तसेच शेतीची अवजारे पाहायला मिळतात
काळीशार जमीन , शुद्ध हवा , मोजकीच लोक वस्ती , प्रदूषण विरहित प्रदेश असलेल्या  या भागत राहणारी माणसंहीमनाने निर्मळ आहेत . मल्हारी मार्तंडा वर निस्सीम भक्ती असणारी हि लोक सकाळी देवातार्चनाला जाताना दिसतात . मोर पाहण्याचा खरा आनंद इथे घ्यायचा असेल तर किमान एक रात्र तरी राहावे लागते . मोर सकाळी ६.० ते ८.०० वाजे पर्यत तर संध्याकाळी ४.३० ते ७.०० वाजे पर्यंत पाहता येतात . शेतात फिरून मोर पाहणे फारच विलोभनीय अनुभव ठरतो . सकाळी  मोर झाडाच्या उंच शेंड्यावर बसून सभोवताल चे निरीक्षण करताना दिसतात . भल्या पाहटे  पासून त्यांच्या ओरडण्याच्या आवाजानेच आपल्याला जाग येते.
जय मल्हार कृषी पर्यटन केंद्रातील नव्याने तयार होणारे नक्षत्र वनहि पाहण्या सारखे आहे . 



मला आवडलेल्या मोरांच्या काही हालचाली या विडीओ मध्ये चित्रित केल्या आहेत 


मोरांसह इतर अनेक पक्षांच्या किलबिलाटाने वातावरण भरून जाते . किकीर्डे , खंड्या, बया पक्षी , खार , भारद्वाज, कबुतरं सहज दिसतात . भाजी पाल्याची शेतीही केली जाते . शेपू, मेथी , कोथिंबीरी सारख्या ताज्या भाज्या सहज मिळतात.  दाट आमराई आणि डाळींबा च्या बागा जागोजागी पाहायला मिळतात . 


तुम्ही झाडाला बांधलेल्या झोपाळ्याचा आनंदही या परिसरात घेऊ शकता .असा झोपाळा तुम्हाला म्हाळसाकांत कृषी पर्यटन केंद्रात पाहायला मिळतो झोपल्यावर झुलत गरम गरम कांदा भज्यांचा आस्वाद घेता येतो 

शेतात ओरडणारे , रुबाबात चालणारे मोर पाहताना मन वेगळ्याच आनंदाच्या विश्वात निघून जात. झाडाच्या शेंड्यावर बसून एकमेकला आरोळी देणारे मोर जेव्हा शेताच्या दिशेने उडू लागतात तेव्हाचे दृश्य अतिशय मन मोहक असते. तुम्हा सर्वासाठी रेकॉर्ड केलेले काही खास मोराचे विडीओ इथे पोस्ट करत आहे . 


गावात फिरताना बर्याच जुन्या विहिरी पाहायला मिळतात. पाण्या अभावी अशा कोरड्या विहिरीन मध्ये बया पक्षी आपले घरटे बांधताना दिसतो . त्याला पाहणे खरच मन मोहून टाकणारा अनुभव असतो .


रांजणगावच्या महागणपतीचे दर्शन आणि निघोज कुंड /रांजण खळगे पाहण्यासाठी साधारण २० किलो मीटर 
अंतर पार करावे लागते . गावकरी तिथ पर्यंत जाण्याकरिता उत्तम मार्गदर्शन करतात . स्वतःचे वाहन 
असेल तर हा प्रवास फारच सुखकर होतो .या निघोज कुंडाचा विडीओ खास तुमच्या साठी  
अनेक वर्षांपूर्वी तयार झालेले हे  रांजण खळगे निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे आणि त्यांचे तयार होणे आजही एक गुपित आहे . 




Ranjangaon Mahaganapati Mandir
रांजण खळगे पाहून झाले कि रांजण गावाच्या महागणपतीच दर्शन आवर्जून घ्या







रांजणगाव  महागणपती मंदिर 
















अतिशय दुर्गम भाग आणि पाण्याचा अभाव असूनही गावकऱ्यांच्या कष्टाचे कौतुक करावे तितके कमी आहे .
कृत्रिम तलाव तयार करून शेती करण्याचा मार्ग शेतकऱ्यांनी स्वीकारला आहे .
मोर आपला राष्ट्रीय पक्षी आहे परंतु त्याचे सहजतेने दिसणे आज काल दुर्मिळ झाले आहे . परंतु या गावात अडीच हजार मोरांची वस्ती आहे आणि इथले शेतकरी पुढाकार घेऊन त्यांचे रक्षण करत आहेत हि खरच अभिमानाची गोष्ट आहे .
चला तर मग कधी निघताय मोराच्या चिंचोलीला ? शुभ यात्रा !!!
वरील दोन्ही भागांबद्दल अभिप्राय नक्की कळवा ……….

Sunday, July 26, 2015

मोराची चिंचोली : भाग पहिला

नाचरे मोरा  आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच
अशी बाल कविता आपण किती सहज गातो पण खरच आंब्याच्या वनात नाचणारा मोर प्रत्यक्ष पाहता आला तर किती मौज येईल !आज शहरी जीवनात जगताना मुलांना आंब्याच्या वनाची आणि नाचणाऱ्या मोराची पुसटशी कल्पना करता येणहि फारच दुर्मिळ आहे . ज्या बच्चे कंपनीला कोकणातले आजोळ असेल किंवा गावी राहणारे आजी आजोबा असतील त्यांनी मोर नाही तरी आंब्याचे बन नक्की पहिले असेल पण गाव नसेल किंवा गावी आजोळ नसेल तरी या सर्वाचा निर्भेळ आनंद मुंबई आणि पुण्यातील लोकांना घेणे आता सहज शक्य झाले आहे .
मुंबई आणि पुण्या पासून जवळच "मोराची चिंचोली " या गावी फेरफटका मारलात तर हे सहज शक्य आहे . जुलै ते सप्टेंबर या महिन्यात पावसाचा सुखद अनुभव घेत घेत , वाहणारे निर्झर  आणि हिरवळ याचा आस्वाद घेत घेत आपण मोराच्या चिंचोलीला येउन कधी पोचतो हे काळतही नाही . वाटेत दिसणारे मेंढपाळ आणि भली मोठी मेंढ्यांची झुंड वारंवार तुम्ही मुंबई सोडून छानश्या खेडेगावा कडे निघाले आहात याची साक्ष देतात .

Morachi Chincholi 

Morachi Chincholi

Morachi Chincholi 
 शुद्ध हवा , प्रदूषण रहित गाव आणि सुखद वातावरण मनाला मोह पाडते . हा प्रदेश तसा कमी पावसाचा असल्याने ठराविक पिक घेतली जातात पण आत्ता गेलात तर डाळींबाच्या ,केळ्याच्या बागा फुललेल्या दिसतात

. बाजरीची शेती दिसते . आणि या बरोबरच चिंच, कवठ आणि मोठ्या प्रमाणात कडुलिंबाची डेरेदार झाडे पाहायला मिळतात . विस्तीर्ण आमराई आणि जुने वृक्ष यांच्या सावलीत झाडांना बांधलेल्या झोपाळ्याची मजा घेता येते.
या भागात कृषी पर्यटन विकास केंद्रांची स्थापनाही झाली आहे त्या अनुशंघाने औषधी वनस्पतीही पाहायला मिळतात . मोराच्या चिंचोलीला जायचे असेल तर कुठे राहाल?

या पर्यटन केंद्रात एक रात्रीच्या राहण्याकरिता सोय उपलब्ध आहे . शाकाहारी जेवणाची सोय होते . तसेच राहण्या साठी नद्यांची नावे असलेली टुमदार कॉटेज राहायला दिली जातात .
 मोर पाहण्यासाठी खास मयुर कट्टा त्यांच्या शेताच्या आवारात बांधलेला आहे . मयुर पॉइट वरून आपण नाचरा मोर आणि लांडोरी पाहू शकतो . परंतु शेतात फिरून मोर पाहण्याचा आणि त्यांच्या नैसर्गिक हालचालींचे निरीक्षण करण्याचा अनुभव  विरळाच असतो
© Kshama Bade
Peacock at the top of tree in Morachi Chincholi मोराची चिंचोली 


मोर पाहणे हा पक्षी निरीक्षणाचाच एक भाग आहे . या परिसरात साधारण अडीच हजार मोर आहेत त्यामुळे या भागात तुम्हाला सतत मोरांच्या ओरडण्याचा आवाज येत राहतो . काही वेळा त्या आवाजा वरून ते फारच जवळ आहेत असा भास होतो . शेतात फिरून या मोरांच्या आवाजाच्या रोखाने गेल्यास हमखास मोर पाहायला मिळतो .  नाचरा मोर , पिस स्वच्छ करणारा मोर , सकाळी झाडाच्या शेंड्या वर बसलेले अनेक मोर पाहायला मिळतात . मोराबरोबरच लांडोरीही फार मोठ्या संख्येत पाहायला मिळतात . शेतात तीन चार लांडोरी फिरताना दिसल्या तर समजावे कि मोर आसपासच  आहे .  मोर आणि लांडोर या दोघानाही उडताना पाहणे हे खरच दुर्मिळ दृश्य आहे . परतू मोराच्या चिंचोलीत असे अनुभव सहज मिळतात मोरांव्यातिरिक्त विविध प्रकारचे  पक्षी पाहायला मिळतात . बया पक्षी घरटी बांधताना आपण सहज पाहू शकतो
© Kshama Bade
मोराची चिंचोली बया पक्षी

म्हाळसाकांताच पुरातन मंदिरं आणि खेडेगावातील साध जीवन मनाला जीवनातील खऱ्या आनंदाची जाणीव करून देत आणि रोज आपल्या पैशांभोवती सजवलेल्या ध्येय वादाच्या मागे धावणारे आपण काही क्षण थांबून पुन्हा मनाला प्रश्न विचारतो कि खरच सुख म्हणजे नक्की काय असत ?लांबवर पसरलेली शेत , त्यात कष्ट करणारे शेतकरी पहिले कि मन कृतज्ञतेने भरून येत . त्यांच्या कष्टातून पिकणाऱ्या धान्यातून,भाजी पाल्यातूनच
आपले रोजचे पदार्थ तयार होत असतात . अशा शेतकऱ्यांच्या कष्टांना आणि त्यांच्या जीवनशैलीला मनापासून सलाम !

मोराच्या चिंचोली पासून वीस किलोमीटर वर आणखी एक महत्वपूर्ण आणि निसर्गाचा अनोखा आविष्कार दाखवणार ठिकाण पाहायला मिळत निघोज कुंड /मळगंगा कुंड /रांजण खळगे अस त्यांना म्हटल जात . अनेक वर्षांपूर्वी नैसर्गिक रित्या तयार झालेले खळगे (पॉट होल्स ) इथे आपल्याला पाहायला मिळतात . फक्त त्यांच्याशी खेळ करण धोकादायक ठरू शकत . गावकरी अस सांगतात कि वरून छोटे  दिसणारे हे खळगे फार खोल असून त्यांना आतून भुयारे तयार झाली आहेत . एखादी व्यक्ती खळग्यात पडली तर पुन्हा बाहेर येऊ
शकत नाही .
रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड 
© Kshama Bade
रांजण खळगे /निघोज कुंड /मळगंगा कुंड 

अष्टविनायकातील रांजण गावचा महागणपतीही इथून जवळच्या अंतरावर आहे . त्याचेही दर्शन आपण नक्की घेऊ शकतो . शिवाय शिक्रापूर पासून जवळच संभाजी महाराजांची समाधी हि पाहता येते . दोन दिवसाच्या या सफरीत शहरातील गोंधळ, कोलाहल ,प्रदूषण , दगदग , स्ट्रेस या पासून आपण अनेक योजने दूर जातो असा म्हणायला हरकत नाही
या लेखाच्या पहिल्या भागात आपण इथेच थांबू . दुसर्या भागात आणखी काही नवीन फोटो आणि विडीओ पाहण्यासाठी या ब्लोग ला जरूर भेट द्या पुढचा भाग पुढील आठवड्यात प्रसिद्ध होईल

Tuesday, July 14, 2015

जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे

जमिनीवर बसून जेवणाचे 10 फायदे - 
 पचन सुधारते 
जमिनीवर मांडी घालून बसल्याने, अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. तसेच जमिनीवर ताट असल्याने जेवणाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते  या सतत होणार्‍या शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंना चालना मिळते व पचनाची क्रियादेखील सुधारते.वजन घटवण्यास मदत होते 
जमिनीवर बसून जेवल्याने, वजन कमी होण्यासही मदत होते. जमिनीवर बसून जेवताना, मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते.  वजन वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे प्रमाणापेक्षा अधिक खाणे.  जमिनीवर बसून जेवताना ‘वेगस नर्व्ह’ (पोटाकडून मेंदूला संकेत देणारी) भूक व जेवणाचे प्रमाण योग्यप्रकारे राखू शकते.  टेबलापेक्षा जमिनीवर बसून जेवल्याने, जेवणाचा वेग मंदावतो व पोट आणि मेंदूतील समन्वयता सुधारते. परिणामी अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते व वजनही काबूत राहते.{1}
लवचिकता वाढवते 
पद्मासनात बसल्याने, पाठीचे, कमरेतील तसेच पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने पचनसंस्थेचा मार्ग सुधारतो. अशा स्थितीत बसल्याने पोटावर ताण येण्याऐवजी जेवण पचण्यास व ग्रहण करण्यास मदतच होते. परिणामी पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.
मन शांत होते व खाण्यावर लक्ष केंद्रित होते
जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व तुमचे सारे लक्ष जेवणाकडेच राहते. मनाची अस्थिरता कमी झाल्याने, जेवणातून मिळणारी पोषणतत्त्वे शरीर अधिक उत्तमप्रकारे ग्रहण करण्यास समर्थ होते. प्रख्यात आहारतज्ञ ऋजुता दिवेकर यांच्यामते, जेवताना त्याचा स्वाद, चव, स्वरूप यावर लक्ष दिल्याने तसेच तुम्ही किती प्रमाणात त्याचे सेवन करत आहात याबाबत सजग राहिल्यास तुम्ही वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवू शकता.कुटुंबातील सदस्यांशी जवळीक  वाढते 
दिवसातील किमान एका जेवणाचा आपल्या कुटूंबासोबत जरूर आनंद घ्यावा. कारण जमिनीवर बसून जेवल्याने मन शांत व प्रसन्न होते. दिवसभरातील क्षीण व ताणतणाव हलका होतो. तसेच एकमेकांशी बोलल्याने, काही समस्यांतून मार्ग शोधण्यास  मदत होते व नकळत कुटूंबातील सदस्यांशी  जवळीक वाढते.
 शरीराची स्थिती (पॉश्चर) सुधारते 
शरीराची स्थिती उत्तम राखणे हे निरोगी आरोग्याचे गमक आहे. उत्तम शारीरिक स्थितीमुळे काही अपघात टळू शकतात तर शरीरातील काही स्नायू व  सांध्यांवरील अतिरिक्त ताण कमी करून थकवा कमी होण्यासदेखील मदत होते. जमिनीवर बसून जेवताना पाठीचा कणा ताठ राहतो व पोट, खांदा व पाठीच्या स्नायूंची योग्य प्रमाणात हालचाल होते.
दीर्घायुषी बनवते 
ही अतिशयोक्ती नाही. जमिनीवर बसून जेवल्याने आयुष्य वाढते. ‘European Journal of Preventive Cardiology’च्या{2} अहवालात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार, जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर त्यांचे आयुष्यमान अधिक आहे, असे समजावे.  कारण अशा स्थितीतून उठण्यासाठी शरीराची लवचिकता अधिक असणे गरजेचे आहे. आणि जी व्यक्ती उठू शकत नाही त्यांचा मृत्यू नजीकच्या 6 वर्षात होण्याची शक्यता 6.5 पटीने अधिक असते.
गुडघे व  कमरेतील सांधे मजबूत होतात
 पचन संस्थेसोबतच सांधेदुखीचा त्रास होत नाही. गुडघा, घोटा व  कंबरेतील सांधे लवचिक राहिल्याने अनेक विकार दूर होण्यास मदत होते. जमिनीवर बसल्याने स्नायूंबरोबर सांध्यांची लवचिकतादेखील वाढते.
चंचलता कमी होते 
मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. म्हणूनच जेवताना जमिनीवर मांडी घालून बसण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे मन, मेंदू व परिणामी शरीरातील  त्रास कमी होतात.
हृदयाला होणारा रक्तपुरवठा  सुधारतो 
काही वेळेस जेवल्यानंतर तुम्हाला गरम होते किंवा घाम आल्याचे आठवते का ?  हो हे शक्य आहे. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला  उर्जेची अधिक गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच पचनही सुधारते.

Wednesday, July 1, 2015

लांब लांब रांग!

अजूनही आपल्या आसपास  किती जण फोन बिल / वीज बिल / विम्याचे हप्ते / महानगर पालिकेचे कर / बँक रिकरिंग किंवा पी पी फ चे पैसे रांग  लावून भरतात ? तर उत्तर असेल ८० टक्क्यांपेक्षा जास्त लोक . परवाच पोस्टात काही कामा करिता गेले असता तिकडे वीज बिल भरणार्यांची भली मोठी रांग पाहून मला खूपच आश्चर्य वाटलं . आत्ताच्या युगात असे सगळे व्यवहार पार पाडण्यासाठी विविध पद्धतींचा सहज वापर करता येत असूनही आपण रांग लावण्यात
आपल्या वेळचा अपव्यय का करावा ? सहजच विचार मनात आला कि महिन्या भरात लोकं अशा किती ठिकाणी रांगेत उभे राहत असतील आणि असे उभे राहण्याचे तास मोजले तर किती होत असतील . मुख्य म्हणजे आयुष्याचे बरेचसे तास अश्या लोकांना रांगेत उभ राहवून वाया  दवडावे लागतात . काही वेळा तर अतिमहत्वाची कामे बाजूला सारून अंतिम देय तिथी नजीक आल्याने अशा रांगांना तोंड द्यावे लागते . अनेक  वेळा तर तासंतास उभ राहून आपली वेळ येताच खिडकी बंद होण्याची वेळ येते व त्या दिवशीचा सगळा वेळ  वाया जातो .
जे कुणी माझे हे विचार वाचत असाल त्यांना नक्कीच इंटरनेट वापरण्याची सवय असेल . आता तुम्हीच विचार
करा कि तुम्ही तुमचे जे व्यवहार अशा रांगा  टाळून करता येतील ते सगळे व्यवहार आधुनिक पद्धतीने पूर्ण करता का ? करत असाल तर उत्तमच पण करत नसाल तर लगेच विचार करा कि तुम्ही
आज पर्यंत रांगेत किती वेळ वाया  घालवलात ? आणि पुढेही किती वाया  घालवणार आहात ?
मी तर म्हणेन कि जर तुम्ही या सगळ्या व्यवहारांशी परिचित असाल तर आपल्या आस पास वावरणाऱ्या लोकांना याचे महत्व पटवून द्या/जमणार असेल तर त्यांना मदतही करा . ज्या योगे त्यांचाही वेळ वाया जाणार नाही आणि अप्रत्यक्षरीत्या त्यांच्या जीवनात इतर  गोष्टी करण्याकरिता लागणारा वेळ आणि उर्जा ते वाचवू शकतील , त्यांचे स्वास्थ्य हि उत्तम राहील .  एकमेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ !

Friday, May 29, 2015

कहाणी लंडन च्या आजीबाई ची ~~~ राधाबाई ची

एका बेफाम जिद्दीची गोष्ट.
१९४८/४९ .
राधाबाई,
यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारीर्द्र्य घरात. अचानक एक दिवस इंग्लन्दाहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको हि नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.
नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला.

एक दिवस आकाश कोसळले. थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवर्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते हि ऐन हिवाळ्यात.
बाईच्या हाताल धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर हि अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती. एका जवळ राहणार्या भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. हि म्हणाली "स्वयंपाक". त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला.
..........आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडन ला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
पु ल, अत्रे, यान पासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या) स्टेशन ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत.
बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळहि त्यांनीच बांधले.
त्यांच्या अंतयात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडन चा मेयर हजर होता.
........ आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी सही करीत.

आज नाश्ता काय ?




नाश्त्याला काय करायचं, मला वाटतं हा प्रश्न चिरंतन आहे. माझ्याकडे माझ्या मदतीला जी मुलगी आहे ती माझ्याकडे सोळा वर्षं आहे. ती रोज मला स्वयंपाक करताना बघते पण तरीही तिचा रोजचा प्रश्न असतो की, ताई, नाश्त्याची काय तयारी करू? एरवी ठीक आहे पण कधीकधी कामात असताना असा प्रश्न आला की चिडचिड होते. मग मी तिला म्हणते की अगं आपण काय हॉटेलात राहतो का? तेच ते पदार्थ तर करतो, कर तुझ्या मनानं काहीही. परत थोड्या वेळानं ती येते आणि परत तोच प्रश्न. परवा असंच झालं मग तिला म्हटलं जरा थांब, सांगते तुला. आणि तिरीमिरीत एका डायरीत नाश्त्याला काय काय करतो हे लिहून काढलं, एकच पदार्थ वेगवेगळ्या पध्दतीनं कसा करता येतो हेही लिहिलं. आज मी तुमच्यासाठी तीच यादी शेअर करणार आहे.
उपमा –
१) कॉर्न उपमा, मटार उपमा, गाजर-फ्लॉवर घालून केलेला उपमा,
२) साधा उपमा – आलं-मिरची वाटून, फोडणीला उडदाची डाळ-कढीपत्ता घाला, साखर-मीठ घाला. वर ओलं खोबरं, कोथिंबीर घाला.
३) सांजा – गव्हाचा रवा (दुकानात रेडीमेड मिळतो (दलिया) ) भाजून घ्या. फोडणीला सुकी लाल मिरची, उडदाची डाळ किंवा चण्याची डाळ आणि कढीपत्ता घाला. नेहमीच्या उपम्यासारखा करा.
पोहे –
१) कांदे पोहे २) बटाटे पोहे ३) मटार पोहे
४) बारीक चिरलेला फ्लॉवर आणि गाजर घालून केलेले पोहे
५) दडपे पोहे, चिंचेचा कोळ आणि गूळ घालून केलेले पोहे
इडली –
१) इडली, सांबार, चटणी,
२) कांचीपुरम इडली – इडलीच्या पिठात भिजवलेली चणा डाळ, काजुचे तुकडे, किसलेलं आलं, ओलं खोबरं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जाडसर भरडलेली मिरपूड घाला. इडली पात्राला तूप लावून इडल्या करा. उत्तम लागतात.
३) मिश्र भाज्या घालून केलेली इडली – फ्लॉवर-गाजर बारीक चिरा, त्यात मटार दाणे घाला, आलं-मिरची वाटून घाला, कोथिंबीर घाला, इडल्या करा.
पराठे –
१) मेथी पराठे – बारीक चिरलेली मेथी, वाटलेला लसूण, जिरे पूड, तिखट, मीठ, हळद, तीळ, थोडंसं दही, आवडत असल्यास एखादं पिकलेलं केळं कुस्करून घाला. कणीक घाला. सगळं एकत्र करा. पोळ्यांसारखी कणीक भिजवा. पराठे करा. तेल लावून खमंग भाजा.
२) पालक पराठे – पालक, लसूण, हिरवी मिरची मिक्सरमधून वाटून घ्या. त्यात जिरे पूड, तिखट, मीठ, कणीक घाला. पराठे करा. तेल लावून भाजा.
३) फ्लॉवर पराठे – फ्लॉवर किसून घ्या. बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर घाला. धणे-जिरे पूड, तिखट, मीठ, आमचूर, चिमूटभर गरम मसाला घाला. दोन पोळ्या लाटून मध्ये हे सारण भरा. कडा नीट बंद करा. हलकं लाटा. तूप लावून खुसखुशीत भाजा.
४) मुळ्याचे पराठे – मुळे जाड किसा. १० मिनिटं पंचावर टाकून ठेवा. पंचात घट्ट गुंडाळून पिळून घ्या. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, मिरची घाला. धणे-जिरे पूड घाला, तिखट, मीठ, आमचूर घाला. दोन पोळ्या लाटून सारण भरा. मस्त तूप लावून भाजा.

५) आलू पराठे – उकडलेले बटाटे कुस्करा. आलं-लसूण-मिरची वाटा, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, धणे-जिरे पूड, आमचूर घाला. पुरणाप्रमाणे भरून पराठे करा. तूप/तेल लावून भाजा.
६) कोबीचे पराठे – कोबी किसा, हळद, तिखट, मीठ, जिरे पूड घाला, बारीक चिरलेली कोथिंबीर घाला, कणीक घालून भिजवा. पराठे करा. तेल लावून भाजा. याच पध्दतीनं दुधीचे पराठेही करता येतात.
७) जि-या-मि-याचे पराठे – जिरं भाजून जाडसर पूड करा, मिरे भरड वाटा, कणकेत घाला, तुपाचं मोहन घाला, मीठ घाला. पीठ घट्ट भिजवा. जाडसर पराठे लाटा. तूप लावून भाजा.
आप्पे –
१)चणाडाळ, उडीद डाळ, तांडूळ भिजवून पीठ तयार करा. त्यात आलं-लसूण मिरची वाटून घाला. कोथिंबीर घाला. आप्पेपात्रात आप्पे करा.
२) दोशाचं किंवा इडलीचं उरलेलं पीठ असेल तर त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. आप्पे करा.
उपासाचं थालिपीठ –
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, उपासाची भाजणी, दाण्याचं कूट, बारीक चिरलेली कोथिंबीर, आलं-मिरची-जिरं-साखर वाटून तो ठेचा, तिखट, मीठ घाला. तूप लावून थालिपीठं करा.
साबुदाणा खिचडी –
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, दाण्याचं कूट, साखर, मीठ, आलं-मिरची वाटून, कोथिंबीर, लिंबाचा रस सगळं एकत्र करून तूप जि-याच्या फोडणीवर खिचडी करा.
डोसा –
डोसा, चटणी, भाजी, सांबार, चटणी
उत्तपा –
डोशाच्या पिठात बारीक चिरलेलं कांदा, मिरची, कोथिंबीर, टोमॅटो घाला. तव्यावर जाडसर उत्तपे घाला. किंवा या भाज्या कोशिंबिरीसारख्या एकत्र करा. जाडसर डोसा घालून त्यावर भाज्या घाला. उलथन्यानं दाबा. झाकण घालून उत्तपे करा.
लाह्याचे पिठाचे मुटके
ज्वारीच्या लाह्यांचं पीठ, भरपूर दाण्याचं कूट, जरा जास्त हिंग, हळद, तिखट, मीठ, बारीक कोथिंबीर, आंबट दही. हे एकत्र करा. हाताच्या मुठीनं दाबून मुटके करा. जरा जास्त तेलावर शॅलो फ्राय करा.
फोडणीचं लाह्याचं पीठ –
वर दिलेलं साहित्य एकत्र करा. थोडं पाणी घालून सरबरीत भिजवा. जरा जास्त तेलाची हिंग-मोहरी घालून फोडणी करा. त्यात कालवलेलं पीठ ओता. मंद आचेवर वाफ येऊ द्या.
दूध-साखर-लाह्याचं पीठ एकत्र कालवून खा. किंवा ताकात कालवा, जिरे पूड-कोथिंबीर घालून खा.
नाचणीचा डोसा –
नाचणीचं पीठ, उडदाची भिजवलेली डाळ वाटून त्यात मिसळा. रात्रभर आंबवा. त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. नेहमीसारखे डोसे करा.
मिक्स डाळींची धिरडी किंवा अडाई –
चणा, उडीद, मूग, तूर डाळी, तांदूळ समप्रमाणात घ्या. रात्रभर भिजवा. सकाळी वाटताना त्यात धणे-सुकी लाल मिरची घाला. मीठ घाला, बारीक चिरलेला कढीपत्ता घाला. धिरडी करा.
याच पिठाचे आप्पेही करता येतील
मुगाची धिरडी –
भिजवलेले मूग वाटा. त्यात बारीक चिरलेलं कांदा-मिरची-कोथिंबीर घाला. मीठ-जिरेपूड घाला, किसलेलं आलं घाला. तांदळाचं पीठ घाला. धिरडी करा.
ऑम्लेट –
१) नेहमीसारखं कांदा-मिरची-कोथिंबीर घालून करा.
२) या ऑम्लेटवर किसलेलं चीज घाला.
३) बारीक स्लाईस केलेले मश्रूम, बारीक चिरलेला ब्रॉकोली घाला
३) कधी नुसतं कांदा-टोमॅटो मीठ मिरपूड-चीज घाला.
बरोबर पराठ्यांसारख्या पोळ्या किंवा ब्रेड द्या.
फोडणीची पोळी-भात-ब्रेड
मिक्स पिठांची धिरडी –
कणीक, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, ज्वारी, बाजरीचं पीठ यापैकी आवडीची कुठलीही पिठं घ्या. आपल्याला आवडेल ते प्रमाण घ्या.
१) पालक चिरून, लसूण-मिरची-जिरं वाटून घाला. तिखट, मीठ, हळद घालून सरबरीत पीठ भिजवा. धिरडी करा.
२) टोमॅटो,जिरं, लसूण, मिरची वाटून, तिखट, मीठ, हळद घाला, पीठ भिजवून धिरडी करा.
३) बारीक चिरलेली किंवा किसलेली कुठलीही भाजी (दुधी, गाजर, मेथी इत्यादी) घाला, तीळ, तिखट-मीठ घाला.
तांदळाचं पीठ-बेसन धिरडी
तांदळाचं पीठ आणि बेसन समप्रमाणात घ्या. ताकात भिजवा. लसूण-मिरची जिरं वाटून घाला.
This is for all women.in family who have problem....
आज नाश्ता काय ?

Tuesday, May 19, 2015

लज्जतदार जेवण


सगळ्यात उत्तम एटी केट म्हणजे सर्व चमचे ताटाबाहेर ठेवावेत.
सूप,बासुंदी,रस याच्या वाट्या तोंडाला लावा व्यात आणि घोटा घोटाने संपवाव्यात.
ताक आणि कढी यात थोडे चिमटीने मीठ घालून त्यात तर्जनी फिरवून वाटी तोंडाला लावावी व आतील वस्तू संपेपर्यंत तोंडा पासून वाटी अलग करू नये.आमटीला शक्यतो वाटी घेऊच नये भाताचा पोण तयार करून मध्ये वाढायला सांगावी. वरण मात्र भातावरच, वरणावरील तुपाचा ओघळ बाहेर जाणार नाही याची दक्षता घेऊन बोटाला चटके बसत असताना गरम गरम कालवावा.ताक भात आणि आमटी भात यांची कृती तीच तशीच वरणभातआणि दहीभात यांचीही एकच कृती.जेवताना म्हणजे भाताचा घास घेताना तळहात कोरडा रहायला हवा हे ज्यांना जमत नाही त्यांची मद्रास,केरल इथे बदली होऊ शकते.
रसगुल्ले किवा तत्सम प्याराबोला चमच्याने तुकडे करूनखाणाऱ्या मंडळीचा स्वतःवर विश्वास नसतो, पाक अंगावर सांडेल हि भीती त्यांना वाटत असते, हे पदार्थ अंगठा व तर्जनी यात धरून थोडे तोंड वर करून जिभेवर सरकवायचे असतात.जिलबी मात्र मठ्यात बुचकळून ज्यांना आवडते त्यांनी पाकात बुचकळून तुकड्या तुकड्याने तोंडात सरकवायची असते.श्रीखंड चमच्याने खाणे हा शुद्ध बावळटपणा आहे, हे तर्जनीवर घेऊन गंधा सारखे जिभेला लावायचे असते.पुरीचा तुकडा मोडून त्याचा गोकर्णीच्या फुला सारखा आकार करायचा व त्यात श्रीखंड,बासुंदी,आमरस हि मंडळी भरून जिभेवर सोडायची असतात.
मिठाच्या डावी कडील पदार्थ काही लोक पोळीला लावून किवा भातात मिसळून खातात हा त्या पदार्थांचा अपमान आहे.कधी कधी एखाद्या गवयाचा सूर लागत नाही, ऐकणार्याचा आणि सुरांचा जीव घेतत्याचा प्रवास सुरु असतो आणि मध्येच एकदम अनपेक्षित एखादा गंधार किवा पंचमाचा सूर सणकन लागतो आणि महिफील चमकून जागी होते, चटण्या, कोशिंबिरी हे देखील असे अचानक लागणारे खणखणीत सूर आहेत, यांची बोट जेवताना रुची पालट म्हणून जिभेवर ओढायची असतात.
पंचामृतातील मोहोरीने सर्वांगाचा ठाव घ्यायला हवा.पापड, कुरड्या हे पदार्थ फक्त जागा अडवणारेआहेत, चविष्ट आहेत पण जेवणाच्या ताटात थोडे बेसुरच.हल्ली छोट्या आकाराचे बटाटेवडे वगैरे करतात.बटाटावड्याच एवढ बालिश आणि ओंगळ रूप दुसरे नाही. बटाटा वडा हा काय जेवताना खायचा पदार्थ आहे का ? भजी मात्र चालतात.
स्वच्छतेच्या आचरट कल्पनांनी या चमचा संस्कृतीला जन्म दिलेला आहे. साधा किवा मसाला डोसा जे लोक काट्या चमच्याने खातात त्यांच्या बद्दल मला भीतीयुक्त आदर आहे हे असे कोणाला खाताना पाहिले कि हे लोक पोळी देखील काटा चमच्याने तोडून खात असतील हि शंका मनात पिंगा घालायला लागते .
चिवड्याला चमचा नको पण या यज्ञ कर्मात मिसळीची आहुती द्यायची असेल तर चमचा क्षम्य आहे .
हि पाच बोटे हि पंच महाभूतांचे प्रतिनिधी आहेत. उदा. करंगळी म्हणजे जलतत्व. जेवताना हि पंच महाभूत जेवणात उतरायला हवीत.
राजकारणात आणि जेवणात हे चमचे मंडळी आली आणि भारताची तब्येत बिघडली



Note :लेख  Whats appवरून प्राप्त झाला आहे 

Friday, April 17, 2015

कांदा - कृष्णावळ (उन्हाळ्यात कसा वापराल)



SHANKH


कृष्णावळ - 
अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही.
 कृष्णावळ चा अर्थ कांदा ! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. 
कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो 
CHAKRA
आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात, म्हणून गमतीने कांद्याला कृष्णावळ म्हणतात. कृष्ण आणि वलय या दोन शब्दांचा संधी होऊन हा मराठी शब्द तयार झाला आहे. 
GADA
आणि पात्यांसकट उलटा धरला तर गदाकार व पाकळ्या उलगडून पद्माकारही होतो.
PADMA


कांदा - कृष्णावळ 

उन्हाळ्याच्या दिवसात कांदा वापरल्याने संसर्ग जन्य रोगांपासून दूर राहाता येते 

कांद्याच्या रसात आलं आणि मध घालून चाटण घेतले असता कफ नाहीसा होतो 

किसलेला कांदा कपाळावर ठेवल्याने सर्दी तापात फायदा होतो 

कांदा आणि  आलं यांचा रस काढून त्यात काळ मिरी आणि मीठ घालून दिल्याने 
किंवा कांद्याच्या रसात मध घालून दिल्याने अस्थमा , घसा या साठी फायदा होतो 

कच्चा कांदा खाल्याने TB च्या जंतूंचा संसर्ग होत नाही 

कान दुखत असेल तर कांद्याचा रस थोडासा कोमट  करून दोन ते तीन थेंब कानात 
घातल्यास कान दुखी थांबते 

नाकातून रक्त येत असल्यास कांद्याच्या रसाचा  वापर करावा . रसाचे काही थेंब 
नाकात घातल्याने रक्त थांबेल 

डायरिया झाला असल्यास कांद्याची पेस्ट नाभी  वर  ठेवावी त्याने फायदा होतो 

कांद्याच्या रसात साखर घालून खाल्ल्याने मूतखडा  फुटण्यास मदत होते 

कांद्याचा रस व मध झोपायच्या आधी घेतल्यास झोप चांगली लागते 

विंचू किंवा मधमाशी किंवा अन्य विषार  झाला असल्यास तत्काळ उपाय म्हणून 
कांद्याची पेस्ट लावावी . विषार कमी होण्यास मदत होते 

या खेरीज कांद्याचे इतरही फायदे आहेत 
खोलीत कांदा चिरून ठेवला असता नवीन रंगाचा वास निघून जातो 

घरात पांढरे कांदे ठेवले असता सर्प येत नाहीत 

उष्माघाता पासून वाचण्या साठी नेहमी एक कांदा खिशात ठेवणे उपयोगी ठरते 

दिव्याच्या जवळ कांद्याची फोड ठेवली असता डास आणि किड्यांचा त्रास कमी होतो 


Sunday, March 29, 2015

किचन टिप्स

स्वैपाकघरातील महत्वाच्यी टीपा
आजीचे अनुभवी सल्ले .
१.साखर मुंग्यांपासून सुरक्षित ठेवण्याकरीता साखरेच्या डब्यात वरच ४-५ लवंग ठेवाव्यात.
२.सूखे खोबरे तूरडाऴित खुपसून ठेवले तर ख़राब होत नाही.
३.रस्सा भाज्या खारट झाल्यास त्यात उकडलेला बटाटा घालावा,खारट पणा कमी होतो.
४.लिम्बाचा रस जास्त हवा असल्यास पाच-दहा मिनिटे लिम्बू कोमट पाण्यात भिजवून मगच रस काढावा, रस जास्त निघतो.
५.कोणताही पूलाव किंवा मसालेभात करताना तांदुळ १-२ तास पाण्यात भिजवून ठेवला तर साध्या तांदळlचा पण दाणा वेगळा आणि मोठा होतो.
६.बटाटे झटपट उकळण्याकरिता पाण्यात चिमटीभर हळद घालावी.
७.हिंगाचा वास टिकवीण्यासाठी हिंग तुरीच्या डाळीच्या डब्यात ठेवावा.
८.डाळ किंवा तांदूळाला किड लागण्यापासून जपण्याकरीता त्यात कडूलिंबाचा पाला घालावा.
९.दुधाला वीरजण लावताना आतून थोडीशी तुरटी फिरवावी.दही घट्ट होते.
१०.भाज्यांमध्हे मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह (iron) टिकन्यास मदत होते.
११.भेंडीची भाजी शिजवताना त्यात दोन चमचे दही घातले तर ती चिकट होत नाही.
१२.पुरयांच्या कणकेत चिमटीभर साखर घातली तर पुरया बराच वेळ फुगलेल्या राहतात.
१३.छोले रात्री भिजवताना त्यात मूठभर हरभरा डाळही भिजवावी, त्याने छोले छान रस्सादार आणि दाट होतात.
१४.कट्ट्यावर लिम्बाच्या रसाचे पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासावा, डाग जातात.
१५.कढ़ीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो. अशा कढ़ीलिम्बाची पाने तेलात तळून, डब्यात भरुन ठेवावीत. त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ते बराच दिवस टिकतात.
१६.गाजर, टमाटर, काकडी, बीट, मुळा मऊ किंवा शिळा झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्यात. ताज्या व टवटवीत होतात.
१७.कच्ची केळी दीर्घ काळ ताजी राहण्याकरीता थंड  पाण्यानी भरलेल्या पातेल्यात ठेवावी. साधारण १ आठवड्या पर्यन्त केळी टवटवित राहतात. हे पाणी २ दिवसांत एकदा बदलावे.
१८.पालेभाज्या शिळय़ा सुकलेल्या असल्यास पाण्यात १ चमचा विनेगार किंवा लिम्बुरस घालून ठेवल्या तर ताज्या होतात.
१९.शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात २ चिमटी मीठ टाकावे आणि गैस बंद करून थोड़े परतावे. त्याने साल लवकर सुटतात.
२०.पकोड़े चुरचुरीत हवे असतील तर त्यात बेसन पीठ भिजावताना जरासे मका पीठ घालावे.
२१.शेंगदाणे भाजण्यापूर्वी दाण्याला पाण्याचा हात लावून मग भाजावेत. दाणे खमंग भाजून होतात.
२२.भरीतासाठी वांगी चांगली भाजली जावी म्हणून त्याला पुसटसा गोड़ेतेलाचा हात किंवा सुरीने छोटी चिर पाडली तर भाजताना तयार होणारी वाफ पडेल. भाजल्यानंतर वांगी लगेच पातेल्याखाली झाकून ठेवल्यास साल नीट सुटतात.
२३.खीर करण्यासाठी दूध आटवताना त्यात जायफळ अजिबात घालू नये. त्याने दूध फाटते.
२४.एरंडेल तेलात हळद घालून गरम करावे. गार झाल्यावर तूर हरभरा डाळीना चोळल्यास डाळी पिवळ्या दिसतात. नंतर उन्ह द्यावे.
२५.मिठाला पावसाळयात पाणी सुटते. बरणीवर टिपकागद ठेवून झाकण घट्ट लावावे.
२६.पुदीना वाळवून पूड करून ठेवल्यास दही वड्यात उपयोगी पडतो.
२७.पाक केल्यानंतर साखरेचे परत कण बनू नयेत म्हणून पाकात थोड़े लिम्बू पीळावे.
२८.शिळा ब्रेड कड़क उन्हात वाळवून चूरा करून ठेवल्यास कटलेट करताना उपयोगी पडतो.
२९.फ्रीजर मधे बर्फाचा ट्रे ठेवताना त्याच्या खाली प्लास्टिक पेपर ठेवावा, काढताना ट्रे चटकन निघतो.
३०.रोज विशिष्ट भांड्यात आपण चाहा करतो. त्यास चहाचे डाग पडतात. ते भांडे घासण्या पूर्वी मिठाने चोळल्यास ते डाग चटकन जातात.
३१.पालक शिजवताना तो कच्चाच मिक्सर मधून वाटून मग फोडणीस टाकला तर हिरवा रंग कायम राहतो.
३२.हाताला मच्छी किंवा कांद्याचा वास येत असल्यास बेसन पीठ चोळावे आणि हात धुतल्यानंतर वास जातो.
३३.ताक आम्बट असल्यास त्यात पाणी घालून ठेवावे. वरचे पाणी थोड्या वेळाने अलगद
काढून टाकावे. आम्बटपणा कमी होईल.
३४.ताक केल्यावर लोणी काढायच्या आधी हात चण्याचे, तांदुळाचे किंवा गव्हाचे पीठ लावून स्वच्छ धुवावे. लोण्याने हात बरबटट नाहीत आणि लोणी हाताला अजिबात चिकटून राहत नाही.
३५.ड्राई फ्रूट्स कापायचे असतील तर ते आधी १ तास फ्रीज़ मधे ठेवावे, नंतर त्याना गरम पाण्यात बुडवलेल्या सुरीने कापावे, लवकर कापले जातात.
३६.कोबी शिजवताना त्यात थोडेसे विनेगार घातले तर शुभ्र रंग कायम राहतो.
३७.कधी कधी तुरीची डाळ कूकरमधेही शिजत नाही म्हणून त्यात १ चिमटी मीठ, थोडेसे तेल, थोडीशी हळद व हिंग पूड घालून कुकार मधे शिजवली तर डाळ निट शिजतेच आणि स्वादही छान येतो.
३८.भाकरीचे पीठ जुने झाल्यास भाकरी नीट थापता येत नाही, तुटते. अशा वेळी पीठ गरम पाण्याने भिजवून थोडा वेळ झाकून ठेवावे. भाकरी चांगली होते.
३९.पावसाळयात माशा फार त्रास देतात तेव्हा लोखंडाचा एक तुकडा गरम करून त्यावर कापराच्या दोन वड्या टाकाव्यात म्हणजे माशा नाहीशा.
४०.दोस्याच पीठ हिवाळयात आम्बवण्या करीता थोड गरम पाणी मिक्सर मधे पीठ ग्राइंड करताना घालावे.
४१.लसूण किंचित गरम केला तर कळ्यांची साल लवकर सुटते.
४२.हिरवी मिरची जास्त काळ टिकण्याकरिता देठ काढून, मिरची साठवणीच्या ठिकाणी ठेवावीत.
४३.कापलेल सफरचंद लाल होण्यापासून वाचण्याकरिता त्याला किंचित लिंबाचा रस लावा.
४४.लोणी नेहमी निर्लेपच्या फ्राई पैन मधे कढवा. भांड्याला बेरी अजिबात चिटकत नाही व भांडे त्वरित स्वच्छ होते.
४५.लाडू वड्या करताना पाकात पाण्याऐवजि दूध वापरले तर खव्यासारखी चव येते.
४६.वड्या करताना मिश्रण सैलसर झाल तर परत थोडा भिजवून मिल्क पावडर व पिठीसाखर घालून वड्या थापाव्या.
४७.करंजी, शंकरपाळ, चिरोटे या पदार्थांसाठी शक्यतो तुपाच मोहन वापराव। पदार्थ जास्त खुसखुशीत होतात.
४८.अनारसा तुपात टाकल्यानंतर विरघळला तर मिश्रणात थोड़ी तांदळlची पीठी मिसळlवी.
४९.अनारसा तळताना जाळी कमी पडल्यास खसखशित थोड़ी साखर घालून त्यावर अनारसा थापावा.
५०.घरात किंवा स्वैपाक घरात मोर पिसे ठेवल्यास पाली नाहीशा होतात.
५१.घराच्या कोपरया मध्ये बोरिक पावडर टाकून कॉक्रोचेस ला पळवता येइल.
५२.मिक्सरची पाती धारदार ठेवण्याकरिता महिन्यातून किमान एकदा तरी साध मीठ ग्राईण्ड कराव.
५३.कांदे आणि बटाटे एकत्र साठवू नये त्यानी बटाटे जास्त काळ चांगले राहत नाही.
काय मग? कशा काय वाटल्या ह्या किचन टिप्स?
कळावे..