Showing posts with label दिवाळी. Show all posts
Showing posts with label दिवाळी. Show all posts

Friday, October 17, 2014

दिवाळी रांगोळी

रांगोळी प्रेमिंकरता खुश खबर! शिका रांगोळी घर बसल्या!
या वर्षी काहीतरी नवीन शिकायचं आहे ? दिवाळी करिता खास रांगोळी
काढायची आहे तर मग आजच आपली DVD बुक करा . चित्रात दाखवलेली ऑफर
फक्त २० तारखे पर्यंत उपलब्ध ! संपर्क करा 8108101524

Tuesday, September 30, 2014

संस्कार भारती रांगोळी वर्कशॉप

शिका रांगोळी खास दिवाळी करिता

रंग रंगाने रंगली ती रंगावली , धरती नटली ,खुलली, हसली
दिवाळी रंगाने सजली ,समाधानाने फुलली आणि प्रेमाने बहरली
खरच असा अनुभव देते दिवाळीला दारात काढलेली रांगोळी !
तर मग त्वरा करा, या शिका आणि जाणून घ्या सुंदर रांगोळी काढण्याची कला !

Monday, October 28, 2013

कल्ला

Kalla 


बालपण, मौज,मस्ती,खोड्या, खेळ, भांडणं हे सर्व शब्द एकमेकाशी अगदी निगडीत आहेत. या सर्वांशी
आणखी एका शब्दाचा फार जवळचा संबंध आहे तो म्हणजे निरागस किंवा निष्पाप वृत्ती . कालानुरूप
या बालपणाशी अनेक नवे शब्द जोडले गेले त्यातलाच एक म्हणजे कल्ला ! कालच अशा कल्ल्याचा
एक वेगळा अनुभव मिळाला .

संध्याकाळी नेहमी प्रमाणे ऑफिसातून  घरी आले आणि चहा घेत बसले होते . बाहेर अचानक जोरजोरात
किंचाळण्याचा आणि वेगात काहीतरी घडत असल्या सारखा आवाज आला . मी वेध घेऊन आवाजाच्या दिशेने
पाहायला गेले तो पर्यंत रस्ता आधी सारखाच  शांत दिसत होता. मग आवाज आला कुठून?
मी पुन्हा घरात येउन माझा चहा कार्यक्रम सुरु केला . काही वेळाने परत तसाच गलका ऐकू आला . पुन्हा
जाऊन पाहते तर काही मुल व मुली सायकल चालवत जोर-जोरात किंचाळत जाताना दिसली . त्यांच्या
आवाजाने पूर्ण गल्ली हादरून निघत होती पण त्यांना असे करण्यामागचे कारण विचारण्या करिता एकही
मनुष्य पुढे आला नाही .  मी पुन्हा त्यांच्या येण्याची वाट पाहत तिथेच उभी राहिले . थोड्या वेळाने त्या बाल
टोळीचे पुन्हा त्याच थाटात आगमन झाले . मी सरळ रस्त्याच्या मध्ये जाऊन त्यांची सायकल अडवली आणि
त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला .
आधी थोड दरडावूनच त्यांना असं करण्याच कारण विचारलं . मी अडवलेल्या सायाकालीन्व्यातिरिक्त आणखी
पंधरा सायकली मला घाबरून तिथून निघून गेल्या .  कारण विचारल्यावर नेहमी प्रमाणे मुल माफी मागू लागली . थोड्या वेळाने मी त्यांना बाकीच्या सर्व सवंगड्याना  बरोबर घेऊन यायला सांगितले . मला वाटल होत कि मी ओरडेन म्हणून ती घाबरतील आणि येणार नाहीत . पण थोड्याच वेळात ती जवळ जवळ वीस सायकल स्वारांची  टीम मला भेटायला आणि माझी माफी मागायला आली . हे मला फारच अनपेक्षित होते . "तुम्ही सायकल चालवू नका असे माझे अजिबात म्हणणे नाही परंतु ज्या पद्धतीत किंचाळत तुम्ही शांती भंग करीत आहात हे योग्य नाही"हे माझे सांगणे त्यांना मनापासून पटले होते. खरतर आपण यात काही चूक करीत आहोत हे त्यांना कळलेहि नव्हते . आस पास म्हातारी, आजारी माणास, लहान बाळ असतात तेव्हा इतरांना त्रास होईल असा गलका करू नका असे सांगितल्यावर त्यांना खरच वाईट वाटले आणि तसे न करण्याचे त्यांनी कबुल केले .
आपण नेहमी म्हणतो कि आजची पिढी Mature आहे त्यांना सगळ काही फार लवकर कळत … हे काही अंशी सत्यही आहे परंतु आज काल आपणही त्यांना गृहित धरून त्यांच्यातील निरागसतेचा चुकीचा अर्थ तर लावत नाही न याचा शोध घेतला पाहिजे . काल  त्या मुलांना ओरडताना सुरवातीला हि मुले सगळ काही काळत असून , इतरांना मुद्दामून त्रास व्हावा म्हणूनच अस वागत आहेत हे मी कुठेतरी गृहीत धरलं होतं परंतु त्यांच्याशी संवाद साधल्यावर लक्षात आलं कि ती त्यांची निरागसता होती . किंबहुना मला असं जाणवलं  कि योग्याठीकाणी , योग्यवेळी मोठ्यांनी आम्हाला अयोग्य गोष्टी करताना रोखाव अस त्यानाही
वाटत होतं . यातून एकच गोष्ट जाणवते मुलाचं बालपण योग्यरीतीने जपायचं असेल तर त्यांच्याशी पूर्वग्रह दुषित न होता संवाद साधा .
आधुनिक जगात वावरणाऱ्या या मुलांना टेक्नोलॉजी लवकर कळते परंतु भावना कळायला उशीर होतोय .  हा उशीर टाळायचा असेल तर परिवाराने सातत्याने त्यांच्याशी संवाद साधण्याचा आणि त्यांचे उत्तम मार्गदर्शक होण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे .
आणि  पालकांनी स्वतःला या गोष्टींसाठी सर्वतोपरी तयार करणे आवश्यकच  आहे .

Thursday, October 24, 2013

आली दिवाळी


Happy Diwali 

जमल तर दिवाळी अशी साजरी करून पहा

* विकतची बर्फी / मिठाई आणण्या पेक्षा घरात काजू / नारळ / गाजर /दुधीच्या वड्या करून पहा .
  नकली मावा आणि चांदीच्या वर्खा पासून स्वतःला आणि परिवाराला वाचवा .

* जोरदार आवाजाचे फटाके वाजवण्या पेक्षा फटाक्यांवर होणारा खर्च अनाथ आश्रमात फराळ वाटण्या
करिता करा .

*  रोषणाई करिता विजेचा वापर शक्यतो टाळा .

* मेसेज पाठवण्या पेक्षा किंवा फोन वर दिवाळी शुभेच्छा देण्या पेक्षा आपल्या जवळच्या माणसाना
प्रत्यक्ष भेटण्याचा प्रयत्न करा त्यांना तुमचा वेळ देऊन सणाचा आनंद द्विगुणीत करा

* दिवाळी आणि रांगोळी तसेच मातीचा किल्ला ह्या अविभाज्य गोष्टी आहेत . घरातील छोट्यांना
याचा परिचय करून द्या .

* दिवाळीचे सगळे दिवस,  त्या त्या दिवसाच महत्व अबाधित राखून आणि आपापसातले वाद / भांडण तंटे
विसरून मनापासून साजरे करा

* सणाला आपल्याला कुणी काय दिलं याच मोजमाप करत बसू नका . परंतु तुम्हाला तुमच्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी जे काही करणे शक्य असेल ते सर्व करा .