Showing posts with label लाच. Show all posts
Showing posts with label लाच. Show all posts

Monday, February 25, 2013

आयुष्य

आयुष्यातील चढ उतार कुणालाही चुकले नाहीत.  संकटं आली कि हातात हात घालून येतात. आर्थिक, मानसिक ,शारीरिक एकदम एकत्र  जमतात . एकातून बाहेर पडाव तर दुसरं हजर असत . परंतु परिस्थिती बदलली कि हेच सगळ सोपं  वाटत . सगळ्या संकटांना सहज पळवता येत आणि" अरे हे आपण आधी का नाही केल ?"असं स्वतः लाच विचारावस वाटत. संकटं गेली तरी मनावरचे घाव भरत नाहीत. असं असलं तरी आयुष्य काही थांबत नाही. म्हणून सतत आनंदी राहावं, आयुष्याला हसत मुखाने सामोर जाव . संकटकाळी इतरांना मदत 
करावी , कधीतरी याच नावेत आपणही प्रवास करत होतो याची जाण सतत असू द्यावी.